औरंगाबाद जिल्ह्यात 33 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर

जिल्ह्यात 44658 कोरोनामुक्त, 400 रुग्णांवर उपचार सुरू
औरंगाबाद, दिनांक 11 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 52 जणांना (मनपा 40, ग्रामीण 12) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 44658 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 33 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 46276 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1218 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 400 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.
मनपा (30)
कुशल नगर (1), बेगमपुरा (3), मिल्ट्री हॉस्पिटल परिसर (1), गजानन नगर, गारखेडा परिसर (1), देवानगरी (1), दिशा संस्कृती, पैठण रोड (1), मेहबुबिया कॉलनी (1), समर्थ नगर (1), शिवाजी नगर (5), अन्य (15)
ग्रामीण (3)
अन्य (3)
तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू
घाटीत पुंडलिक नगरातील 67 वर्षीय स्त्री, न्यायालयीन सोसायटी परिसरातील 87 वर्षीय पुरूष आणि खासगी रुग्णालयात चंद्रगुप्त नगरीतील 70 वर्षीय पुरूष कोरोनबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
**