• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, July 1, 2022
  • Login
MH 20 Live News
Advertisement
  • मुख्यपान
  • मुख्य बातम्या
  • मराठवाडा
    • औरंगाबाद जिल्हा
    • औरंगाबाद शहर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • संपादकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य
  • बिझनेस
  • लाइफस्टाइल
  • शेती
  • अन्य
    • क्रीडा
    • नोकरीविषयक
No Result
View All Result
  • मुख्यपान
  • मुख्य बातम्या
  • मराठवाडा
    • औरंगाबाद जिल्हा
    • औरंगाबाद शहर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • संपादकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य
  • बिझनेस
  • लाइफस्टाइल
  • शेती
  • अन्य
    • क्रीडा
    • नोकरीविषयक
No Result
View All Result
MH 20 Live News
No Result
View All Result
Home मुख्य बातम्या

दावोसमध्ये जय महाराष्ट्राची गर्जना -उद्योगमंत्री सुभाष देसाई

by mh20live
June 3, 2022
in मुख्य बातम्या, संपादकीय
दावोसमध्ये जय महाराष्ट्राची गर्जना -उद्योगमंत्री सुभाष देसाई
0
SHARES
3
VIEWS
FacebookTwitterWhatsapp

दावोसमध्ये जय महाराष्ट्राची गर्जना -उद्योगमंत्री सुभाष देसाई

नुकतीच दावोस येथे जागतिक आर्थिक परिषद संपन्न झाली या पार्श्वभूमीवर उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची माहिती व जनसंपर्क विभाग निर्मित दिलखुलास या कार्यक्रमासाठी जेष्ठ पत्रकार संजय जोग यांनी मुलाखत घेतली. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत हे या परिषदेला गेले होते. या परिषदेत 80 हजार कोटींचे 24 सामंजस्य करार झाले आहेत. यातुन सुमारे एक लाख रोजगार निर्मीती अपेक्षीत आहे. वस्त्रोद्योग, अन्न प्रक्रीया, ते तंत्रज्ञान या विविध क्षेत्रात ही गुंतवणूक आली आहे. या माहितीसह या परिषदे दरम्यान आलेले अनुभव श्री. देसाई यांनी या मुलाखतीत सांगितले आहेत. त्याचबरोबर इथे झालेले गुंतवणूक प्रस्ताव, रोजगार निर्मीतीची संधी आणि महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीचा थोडक्यात आढावा त्यांनी घेतला.  या मुलाखतीतील हा संपादित अंश त्यांच्याच शब्दात.

दावोसमध्ये ही परिषद दरवर्षी  हिवाळ्यात होत असे, परंतु यावेळी मे महिन्यात ही परिषद झाली. आम्ही माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनात या ठिकाणी गेलो. माझ्या सोबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत हे होते. या परिषदेत जाऊन राज्यातील गुंतवणूक वाढीसाठी प्रतिनिधित्व तर केलेच पण राज्याच्या दालनात जय महाराष्ट्राची गर्जना केली.

 यावेळच्या परिषदेची संकल्पना  ‘जागतिक आर्थिक स्थिती आणि आव्हाने, पर्यावरण रक्षण, बदलाचे परिणाम दुष्परिणाम’ अशी होती. या विषयांवर जगभरातील तज्ज्ञ मंडळी मार्गदर्शन करतात. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी यावेळी सर्वांसमोर चर्चा केली. त्यांच्या भाषणाचा सकारात्मक परिणाम जाणावत होता. अनेक देशातील प्रतिनिधी त्यानंतर चर्चा करण्यासाठी येत होते.

आम्ही २२ तारखेला आमच्या दालनाचं उद्घाटन केले. महाराष्ट्र दालनात अनेकांना भेटी दिली. सर्वात जास्त गर्दी ही राज्याच्या दालनाला असायची. इथे आम्हाला चाळीस बैठका घ्याव्या लागल्या. महाराष्ट्राची बाजू मांडताना अभिमान वाटत होता.

एक लाख रोजगार निर्मीती क्षमता असलेली 80 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक

या परिषदेत 24 कंपन्यासोबत करार केले. एकूण 80  हजार कोटींची गुंतवणूक झाली. झालेले करार केवळ कागदावरच राहू नयेत यासाठी आम्ही सर्व करार तपासून. त्यांचे गांभीर्य समजून घेतले. आणि मगच हे करार केले आहेत. त्यामुळे हे सर्व करार प्रत्यक्ष कार्यान्वित होतील असा विश्वास आहे. यातून  प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष असे सुमारे एक लाख रोजगार निर्मीती होणार आहे.

हे करार विविध क्षेत्रातील आहेत.  राज्यात सर्वत्र उद्योग जावेत, असे नियोजन केले आहे. इंडोरमा या टेक्सटाईल कंपनीने कोल्हापूरमध्ये गुंतवणूक केली आहे. नागपूरला वस्त्रोद्योग क्षेत्रात गुंतवणुक येते आहे. अनेक उद्योगांनी फळप्रक्रिया, अन्न प्रक्रिया उद्योगात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. हॅवमोर आईस्क्रीम सोबत करार झाला आहे.  उद्योगांचा विस्तार होताना प्रादेशिक समतोल साधला जाणार आहे.

मायक्रोसॉफ्ट कंपनीने साडेदहा हजार कोटींची गुंतवणूक करण्यासाठी पुण्याला प्राधान्य दिले आहे. वाहन, अभियांत्रिकी, आयटी क्षेत्रातील कंपन्या गुंतवणूक करत आहेत. जपानची सेनटोरी गुंतवणूक करत आहे. युनायटेड फॉस्फरस कंपनीने रायगड जिल्ह्यात पाच हजार कोटींची गुंतवणूक करण्याची तयारी दर्शविली आहे. पल्प अँड पेपरमध्ये साडेदहा हजार कोटींची गुंतवणूक आणण्यात आली आहे.

उर्जा क्षेत्रात मोठी गुंतवणूक

 न्यू पॉवर कंपनीने पुढील सात वर्षांत पन्नास हजार कोटींच्या गुंतवणुकीची तयारी दर्शविली. ग्रीन पॉवरसाठी हे महत्वाचे पाऊलं पडलेले आहे. ऊर्जा निर्मितीसाठी 50 हजार कोटी गुंतवणूक करण्यासाठी रि न्यू पॉवर कंपनीने राज्य शासनासोबत करार केला. याद्वारे राज्यात 10 ते 12 हजार मेगा वॅट उर्जा निर्माण होणार आहे.

यापरिषदेत झालेल्य करारांमधुन उभ्या राहणाऱ्या उद्योगातून मोठ्या प्रमाणात नोकऱ्यांच्या संधी मोठ्या प्रमाणात तयार होणार आहे. मिळणाऱ्या महसूलातून राज्याच्या उत्पादनात भर पडणार आहे. त्याच बरोबर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष १ लाख जणांना रोजगार मिळणार आहे.

महाराष्ट्र थांबला नाही, थांबणार नाही

कोविडची लाट आली याची झळ संपुर्ण जगाला सोसावी लागली. पहिल्या लाटेत अचानक लॉकडाऊन जाहीर झाल्यामुळे उद्योग बंद पडले. त्या काळात अर्थचक्र थांबले होते. परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वांची बैठक घेतली. रोजगाराची हानी होता कामा नये, यासाठी नियोजन केले, टास्क फोर्स तयार केले. सर्व खबरदारी घेऊन उद्योग सुरू ठेवले. औद्योगिक गुंतवणुकीचे १० करार केले. त्यातून तीन लाख कोटींचे करार पूर्ण केले. हा ओघ थांबला नाही. थांबणार नाही. महाराष्ट्र थांबला नाही, थांबणार नाही.

हवामान बदल आणि पर्यावरण संवर्धन

आर्थिक परिषदेचा मुख्य रोख हवामान बदल आणि पर्यावरण संवर्धन होता. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे  यांना मेटा (फेसबुक) गुगल, सेल्सफोर्स आणि बेल्जियमचे पंतप्रधान अलेक्झांडर डी. कृ यांनी आयोजित केलेल्या स्वागत समारंभात आमंत्रित केले होते. यावेळी एक आदर्श गुंतवणूक आणि पर्यटन स्थळ म्हणून जागतिक स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. 

या परिषदेत ग्लोबल प्लास्टिक ने केवळ महाराष्ट्रा सोबत करार केला.  कारण सिंगल प्लास्टिक वापरावर बंदी घालणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. यासाठी आपल्या राज्याला त्यांनी पसंती दिली. त्याच बरोबर ग्रीन बिल्डिंग ही संघटना आहे, त्यांनी पर्यावरण पुरक बांधकामाच्या संदर्भात प्रस्ताव दिला आहे. महाराष्ट्रामध्ये पर्यावरण, हवामान बदलाबाबत जे काही काम होते, त्याची जागतिक पातळीवर दखल घेतली जात आहे.

 मॅग्नेटिक महाराष्ट्र २.० अंतर्गत तीन लाख कोटीचे करार

            मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0 य कार्यक्रमाची संकल्पना मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात रबविली जात आहे. आता पर्यंत सुमारे बारा आवृत्त्या आयोजित करण्यात आल्या आहेत आणि त्या माध्यमातून सुमारे तीन लाख कोटींचे करार झाले आहेत. देशाच्या एकुण थेट परकीय गुंतवणूकित राज्याचा सातत्याने सर्वात मोठा वाटा राहिला आहे.

महाराष्ट्र पुरोगामी विचारांचे राज्य आहे. त्यांना विविध पर्याय मिळतात. गुंतवणुकदारांच्या संकल्पना समजून घेण्याची जाणिव आणि कुवत महाराष्ट्राकडे आहे. आम्ही महाराष्ट्रात जाऊन गुंतवणूक केली तर आम्हाला संधी मिळेल, असा विश्वास गुंतवणूकदारांना वाटतो.

सर्व सार्वजनिक वाहतुक विजेवर चालणार

इलेक्ट्रिक व्हेईकल धोरण राबविणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. टाटा कंपनीने पाच हजार चार्जिंग स्टेशन उभे करण्यासाठी करार केला आहे. बेस्टने दीड हजार बसेस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. सन 2030 पर्यंत विजेवर चालणाऱ्या वाहनांची संख्या मोठी असेल सार्वजनिक वाहतुक ही वीजेवर चालणारी असेल. त्या दृष्टीने वाटचाल वेगाने सुरू आहे.

नवउद्योजकांना प्रोत्साहन

नव उद्यमींनी स्वःताच्या पायावर उभे राहावे, यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना सुरू आहे. स्वयंरोजगार योजना आणली. छोट्यातून मोठे उद्योजक तयार होण्यासाठी ही योजना आहे. अन्न प्रक्रिया, वाहन उद्योग, तयार कपडे निर्माण करणे, यासारखे व्यवसाय सुरु करुन महिला बचत गटापासून होतकरू तरुण या माध्यमातून आपल्या पायावर उभे राहू शकतात.

व्हेंचर कॅपिटलमुळे विनातारण खेळते भांडवल मिळते आहे. मुंबई शेअर बाजारात आतापर्यंत चारशे कंपन्यांची नोंदणी झाली आहे. यातून 35 हजार कोटींची गुंतवणूक झाली आहे. लघु व मध्यम उद्योगांना गुंतवणुकीची संधी मिळाली आहे. महाराष्ट्र शासनाने यात काही प्रमाणात गुंतवणूक करावी असा आमचा विचार आहे. यातून उद्योगांना पाठिंबा मिळेल.

नवीन औद्योगिक धोरण तयार केले जात आहे. आम्ही उद्योगांशी सातत्याने चर्चा करत आहोत. आयटी पॉलिसी येते आहे. देशातील एक क्रमांकाची आयटी पॉलिसी आणत आहोत. आयटीच्या क्षेत्रात गुंतंवणूक करणाऱ्यांनी कौशल्ये विकासासाठी गुंतवणूक करावी. त्यातून त्यांना कुशल मनुष्यबळ मिळेल आणि स्थानिक मुलांना रोजगार मिळेल. याचा आम्ही या धोरणात समावेश केला आहे.

कोविडमुळे सर्वत्र उद्योगांना ब्रेक लागला होता, आता नव्याने पुन्हा उद्योग सुरु करतांना उद्योजकांमध्ये झालेले नुकसान भरून काढण्यासाठी अधिक जोमाने काम करण्याचा उत्साह दिसून येत आहे. यामुळे  अर्थचक्राला गती मिळाली आहे. संकटानंतर ही संधी आली आहे. त्याचा उद्योग जगताने फायदा घेतला पाहिजे.

***

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, दावोस महत्वाचे मुद्दे

·        राज्याने 24 कंपन्यांसोबत रु. 80 हजार  कोटी गुंतवणूकीचे आणि 2 धोरणात्मक सामंजस्याचे करार केले.

·        रिन्यू पॉवर महाराष्ट्रात अक्षय ऊर्जा निर्मितीसाठी ५० हजार कोटी गुंतवण्यास वचनबद्ध

·        या करारातून सुमारे एक लाख रोजगार निर्मीतींची शक्यता

·        पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्यासह मुख्यमंत्र्यांचे अति. मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, अति. मुख्य सचिव उद्योग बलदेव सिंह, महावितरणचे व्यवस्थापकिय संचालक विजय सिंघल, एम आयडी सी चे सिईओ डॉ पी. अनबलगन, सह मुख्य कार्यकारी अधिकारी पि.डी. मलिकनेर आणि महाव्यवस्थापक पणन व जनसंपर्क अभिजित घोरपडे या सोहळ्यात स्वाक्षरी करणा-या कंपन्यांच्या उद्योग प्रतिनिधींसह उपस्थित होते.

·        इंडोरामा कॉर्पोरेशन आणि इंडोकाउंट इंडस्ट्रीज लिमिटेड सारख्या टेक्सटाईल कंपन्यांचे इतर प्रमुख गुंतवणुकीचे उद्दिष्ट होते.

·        महाराष्ट्रातील अनुक्रमे नागपूर आणि कोल्हापूर या टेक्सटाईल हबमध्ये गुंतवणूक करत आहेत.

·        मायक्रोसॉफ्ट ही जगातील सर्वात मोठी सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर आयटी कंपनी पुण्यात डेटा सेंटर्स स्थापन करण्यासाठी रु. ३२०० कोटी रुपयांची गुंतवणूक करत आहे,

·        हॅवमोर आईस्क्रीम, गोयल प्रोटिन्स व सोनाई इटेबल्स या सारखे अन्न आणि उत्पादन प्रक्रिया प्रकल्प विदर्भात  गुंतवणूक करत आहेत. आणि ग्रामस्की बिजनेस हब ही कंपनी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात रु. ५००० कोटींची गुंतवणूक करणार आहे, यामुळे महाराष्ट्राच्या आयटी इकोसिस्टमला चालना मिळेल.

·        राज्य सरकारने राज्यातील दुर्गम भागातील शाळांमध्ये आणि मुंबईतील महापालिका शाळांमध्ये डिजिटल सामग्री सादर करण्यासाठी बायजूस यांच्या सोबत सामंजस्य करार केला, याप्रसंगी मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल, सचिव (शालेय शिक्षण) रणजित सिंग देओल व बायजूसचे संस्थापक बायजू रवींद्रन व दिव्या रवींद्रन उपस्थित होते.

·        जागतिक ग्रीन बिल्डिंग कौन्सिलसोबत ज्ञानाची देवाणघेवाण करण्यासाठी, राज्याला  शून्य उत्सर्जन लक्ष्य साध्य करण्यास मदत करण्यासाठी आणि पर्यावरणीय शाश्वत प्रशासनातील राज्य प्राधिकरणांच्या क्षमता वाढीसाठी धोरणात्मक सहकार्य करारावर स्वाक्षरी केली.

***

शब्दांकन

अर्चना शंभरकर

वरिष्ठ सहायक संचालक

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय

9987037103

Previous Post

सुट्टीत मावशीकडे आलेल्या दोन बहिणीचा बंधाऱ्यात बुडुन मृत्यू. -माजलगाव तालुक्यातील महातपुरी येथील घटना

Next Post

अशोक सराफ यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस झी टॉकीज सादर करणार चित्रपटांचा खास नजराणा

Related Posts

कल्याण ज्वेलर्सने औरंगाबादमध्ये नवे शोरूम सुरु केले
बिझनेस

कल्याण ज्वेलर्सने औरंगाबादमध्ये नवे शोरूम सुरु केले

June 27, 2022
4
#कल्याण ज्वेलर्स महाराष्ट्रात दोन नवी शोरूम्स सुरु करणार
बिझनेस

#कल्याण ज्वेलर्स महाराष्ट्रात दोन नवी शोरूम्स सुरु करणार

June 25, 2022
9
तमाशा लाईव्ह’चा प्रेक्षकांना संगीत नजराणा
मनोरंजन

तमाशा लाईव्ह’चा प्रेक्षकांना संगीत नजराणा

June 23, 2022
4
राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनकार्यावर भव्य चित्रपट निर्मिती
मनोरंजन

राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनकार्यावर भव्य चित्रपट निर्मिती

June 23, 2022
1
nita ambani ipl जगातील प्रत्येक क्रिडाप्रेमीपर्यंत आयपीएल पोहोचवणे आमचे मिशन – नीता अंबानी
क्रीडा

nita ambani ipl जगातील प्रत्येक क्रिडाप्रेमीपर्यंत आयपीएल पोहोचवणे आमचे मिशन – नीता अंबानी

June 18, 2022
6
टेलिव्हिजन च्या इतिहासात पहिल्यांदाच शेमारू मराठीबाणा वाहिनीवर अनुभवा थेट पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात रंगलेला महाकीर्तन सोहळा
मनोरंजन

टेलिव्हिजन च्या इतिहासात पहिल्यांदाच शेमारू मराठीबाणा वाहिनीवर अनुभवा थेट पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात रंगलेला महाकीर्तन सोहळा

June 18, 2022
2
Next Post
अशोक सराफ यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस  झी टॉकीज सादर करणार चित्रपटांचा खास नजराणा

अशोक सराफ यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस झी टॉकीज सादर करणार चित्रपटांचा खास नजराणा

  • Trending
  • Comments
  • Latest
ट्रॅक्टर-दुचाकीच्या धडकेत ईब्राहिमपुर चे बाप-लेक जागीच ठार,पत्नी गंभीर

ट्रॅक्टर-दुचाकीच्या धडकेत ईब्राहिमपुर चे बाप-लेक जागीच ठार,पत्नी गंभीर

June 12, 2022
विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी वैजापूर तालुक्यातील पं.स.,तहसील कार्यालय व उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे अचानक धावती भेट अनुपस्थित नायब तहसीलदारांच्या निलंबनाचे दिले आदेश

विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी वैजापूर तालुक्यातील पं.स.,तहसील कार्यालय व उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे अचानक धावती भेट अनुपस्थित नायब तहसीलदारांच्या निलंबनाचे दिले आदेश

April 1, 2022
सोन्नथंडी च्या संपत्ती देवगुंडे हा युवक किडनीच्या आजाराने त्रस्त मुंबईच्या नायर हाँस्पीटल मध्ये उपचार सुरू परिस्थिती बिकट असल्याने आर्थिक मदतीची गरज 

सोन्नथंडी च्या संपत्ती देवगुंडे हा युवक किडनीच्या आजाराने त्रस्त मुंबईच्या नायर हाँस्पीटल मध्ये उपचार सुरू परिस्थिती बिकट असल्याने आर्थिक मदतीची गरज 

February 26, 2022
मातीच्या भांड्यात जेवण करणे सोईचे, स्वादिष्ट आणि पौष्टिक

मातीच्या भांड्यात जेवण करणे सोईचे, स्वादिष्ट आणि पौष्टिक

February 12, 2022

The Legend of Zelda: Breath of the Wild gameplay on the Nintendo Switch

0

Shadow Tactics: Blades of the Shogun Review

0

macOS Sierra review: Mac users get a modest update this year

0

Hands on: Samsung Galaxy A5 2017 review

0
कल्याण ज्वेलर्सने औरंगाबादमध्ये नवे शोरूम सुरु केले

कल्याण ज्वेलर्सने औरंगाबादमध्ये नवे शोरूम सुरु केले

June 27, 2022
#कल्याण ज्वेलर्स महाराष्ट्रात दोन नवी शोरूम्स सुरु करणार

#कल्याण ज्वेलर्स महाराष्ट्रात दोन नवी शोरूम्स सुरु करणार

June 25, 2022
तमाशा लाईव्ह’चा प्रेक्षकांना संगीत नजराणा

तमाशा लाईव्ह’चा प्रेक्षकांना संगीत नजराणा

June 23, 2022
राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनकार्यावर भव्य चित्रपट निर्मिती

राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनकार्यावर भव्य चित्रपट निर्मिती

June 23, 2022

Recent News

कल्याण ज्वेलर्सने औरंगाबादमध्ये नवे शोरूम सुरु केले

कल्याण ज्वेलर्सने औरंगाबादमध्ये नवे शोरूम सुरु केले

June 27, 2022
4
#कल्याण ज्वेलर्स महाराष्ट्रात दोन नवी शोरूम्स सुरु करणार

#कल्याण ज्वेलर्स महाराष्ट्रात दोन नवी शोरूम्स सुरु करणार

June 25, 2022
9
तमाशा लाईव्ह’चा प्रेक्षकांना संगीत नजराणा

तमाशा लाईव्ह’चा प्रेक्षकांना संगीत नजराणा

June 23, 2022
4
राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनकार्यावर भव्य चित्रपट निर्मिती

राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनकार्यावर भव्य चित्रपट निर्मिती

June 23, 2022
1
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 MH 20 Live Network

No Result
View All Result
  • मुख्यपान
  • मुख्य बातम्या
  • मराठवाडा
    • औरंगाबाद जिल्हा
    • औरंगाबाद शहर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • क्राईम डायरी
  • मनोरंजन
  • संपादकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य
  • बिझनेस
  • लाइफस्टाइल
  • शेती
  • अन्य
    • क्रीडा
    • नोकरीविषयक

© 2022 MH 20 Live Network

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In