औरंगाबाद जिल्ह्यात आज एकूण 39 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर

जिल्ह्यात 44711 कोरोनामुक्त, 383 रुग्णांवर उपचार सुरू
औरंगाबाद, दिनांक 12 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 53 जणांना (मनपा 46, ग्रामीण 07) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 44711 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 39 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 46315 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1221 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 383 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.
मनपा (32)
सुराणा नगर (2), सदाशिव नगर (3), जय भवानी नगर (1), शिवशंकर कॉलनी (1), एन नऊ, हडको (1), जाधववाडी (1), सरस्वती कॉलनी (1), व्यंकटेश नगर (1), जय भीम नगर (1), सातारा परिसर (1), कांचनवाडी (1), गजानन नगर (1), अन्य (17)
ग्रामीण (7)
दूधड (1), बजाज नगर (1), पैठण (1), धूपखेडा (1), अन्य (4)
तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू
घाटीत सिल्लोड तालुक्यातील गेवराई शेमी येथील 85 वर्षीय पुरूष, नक्षत्रवाडी येथील 80 वर्षीय पुरूष, नूतन कॉलनी, क्रांती चौकातील 80 वर्षीय पुरूष कोरोनबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.