गोरगरीब जनतेला सरकार रेशनकार्डच्या माध्यमातून स्वस्त दरात धान्य उपलब्ध करुन देते.. रेशनचे धान्य घेण्यासाठी बऱ्याचदा नागरिकांना रांगेत ताटकळत उभे राहावे लागते.. ही बाब समोर आल्यानंतर मोदी सरकारने रेशन कार्डधारकांसाठी मोठा निर्णय घेतलाय. त्यामुळे रेशनच्या दुकानासमोर तास न् तास उभे राहण्याची कसरत नागरिकांना करावी लागणार नाही..
सध्या फ्लिपकार्ट, अमेझॉन, ‘झोमॅटो’, ‘स्वीगी’ सारख्या कंपन्या नागरिकांना हवी ती वस्तू घरपोच करतात.. अशीच सेवा आता रेशनचीही मिळणार आहे. नागरिकांना आता घरपोच रेशनचे स्वस्त धान्य मिळणार आहे.. त्यामुळे रेशन दुकानांसमोर रांगा लावण्यातून नागरिकांची सुटका होणार आहे.. विशेष म्हणजे, मोदी सरकारने 22 राज्यांमध्ये हा उपक्रम सुरुही केला आहे.
कशी मिळणार सेवा..?
नागरिकांना घरपोच रेशन मिळवण्यासाठी आपल्या मोबाईलवर ‘उमंग’ हे अॅप डाऊनलोड करावे लागेल.. या अॅपद्वारे नागरिक एका क्लिकवर घरबसल्या आरामात दर महिन्याला रेशन मागवू शकतात.. अगदी सरकारी दरांनुसार हे रेशन नागरिकांच्या घरी पोच केले जाणार आहे..
‘उमंग’ अॅपवरून घरपोच रेशन तर मिळेलच, शिवाय, जवळचे दुकान कुठे आहे, तसेच रेशन दुकानातील वस्तूंच्या किंमतीबाबतही जाणून घेता येणार आहे.. केंद्र सरकारने वाजवी दरात सामान्यांपर्यंत थेट वस्तू पोहोचवण्यासाठी ही खास सेवा सुरु केलीय. ग्राहकांना त्यांच्या सोयीनुसार शासकीय दराने वस्तू खरेदी करता येणार आहेत.